Mahatma Gandhi

Mahatma Gandhi Biography in marathi

Mahatma Gandhi biography in marathi संपूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी जन्म 2 ऑक्टोंबर 1869 वडील करमचंद आईचे नाव पुतळाबाई.

Mahatma gandhi education शिक्षण 1887 मध्ये मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण 1891 मध्ये इंग्लंडमध्ये बॅरिस्टर होऊन भारतात परत आले. Lawyer, Politician, Activist, Writer

Mahatma Gandhi family

Kasturba Gandhi (m. 1883; died 1944)

Children Harilal, Manilal, Ramdas, Devdas

Mahatma Gandhi Works in marathi

  • 1893 मध्ये त्यांना दादा अब्दुला यांच्या व्यापारी कंपनीचा खटला चालवण्यासाठी दक्षिण आफ्रिकेत जावे लागले.
  • दक्षिण आफ्रिकेत असताना त्यांनी स्वतःला ही अन्याय व अत्याचाराला तोंड द्यावे लागले. त्याचा प्रतिकार करण्यासाठी भारतीय लोकांना संघटित करून त्यांनी 1894 मध्ये नाताळ इंडियन कॉंग्रेसची स्थापना केली.
  • 1906 मध्ये तेथील शासनाने एका आदेशवन्य कृष्णवर्णीयांना ओळखपत्र बागळणे सक्तीचे केले होते याशिवाय कृष्णवर्णीयांच्या स्वातंत्र्यावर अनेक निर्बंध घातले होते या अन्यायाविरुद्ध गांधीजींनी सत्याग्रहाच्या मार्गाने यशस्वी लढा दिला.
  • 1915 मध्ये गांधीजींनी भारतात परत आले आणि त्यांनी सुरुवातीला साबरमती येथे राहून सत्याग्रह आश्रमाची स्थापना केली.
  • 1917 मध्ये बिहारच्या चंपारण्य भागात ब्रिटिश मळे मालकांकडून भारतीय शेतकऱ्यांवर ठरलेल्या दारात पीक विकण्याची सक्ती केली जात होती. निळ ठरलेल्या दरात मुळे वाल्यांना विकण्याची सक्ती असल्यामुळे त्यात शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत होते गांधीजींनी चंपरण्या शेतकऱ्यांना संघटित होऊन सत्याग्रहाच्या मार्गाने आंदोलन केले परिणामी ब्रिटिश शासनाने शेतकऱ्यांवरील अन्याय दूर केला.
  • 1917 मध्ये गुजरात मध्ये खेडा जिल्ह्यात प्लेगची साथ पसरली तसेच तेथे वारंवार दुष्काळ पडत असे त्यामुळे शेतकऱ्यांना सारा भरणे अशक्य झाले त्यांनी सरकारकडे सारा माफीची मागणी केली. परंतु ब्रिटिश सरकारने ती अमान्य केली. तेव्हा शेतकऱ्यांनी साराबंदी चळवळ सुरू केली.
  • गांधीजीने या चळवळीचे नेतृत्व स्वीकारले आणि साराबंदी चा सत्याग्रह सुरू केला. थोड्याच कालावधीत सरकारने माघार घेतली व शेतसारा माफ केला.
  • 1918 मध्ये अहमदाबाद येथील कापड गिरणीतील येथील कामगारांनी वेतनवाढ मागितली होती गिरणी मालकांनी या वेतनवाढीच्या मागणीला नकार दिला गांधीजींच्या सल्ल्यावरून कामगारांनी संप व उपोषण सुरू केले. गांधीजींनी ही कामगारांना बरोबर उपोषणाला बसले गिरणी मालकांनी कामगारांची वेतनवाढीची मागणी मान्य केली.
  • 1920 मध्ये लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर राष्ट्रीय सभेचे नेतृत्व महात्मा गांधीजी कडे गेले.
  • 1920 च्या नागपूर येथील अधिवेशनात राष्ट्रीय सभेने असहकाराच्या देशव्यापी चळवळीला पाठिंबा देणारा ठराव संमत केला.
  • असहकार आंदोलनाची सर्व सूत्रे महात्मा गांधी कडे सोपवण्यात आली असहकाराच्या ठरावावन्ये शाळा महाविद्यालय विधिमंडळे, न्यायालय, सरकारी कचेऱ्या, परदेशी मालावर बहिष्कार घालण्यात आले.
  • 1924 साले बेळगाव येथे राष्ट्रीय सभेचे अधिवेशन झाले त्याच्यामध्ये गांधीजी हे अध्यक्षपद म्हणून भूषवले.
  • 1930 मध्ये सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू झाली मिठावरील कर व मीठ तयार करण्याची सरकारची मक्तेदारी रद्द करावी अशी गांधीजींनी रोहित कडे मागणी केली व्हाइसरॉयने ही मागणी धुडकावून लावली तेव्हा गांधीजींनी मिठाचा कायदा मोडून सत्याग्रह करण्याचे ठरवले.

दांडी यात्रा (dandi yatra) in marathi

  • मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी गांधीजींनी गुजरात मधील दांडी हे समुद्रकिनाऱ्यावरील गाव निश्चित केले.
  • साबरमती आश्रमातून 78 कार्यकर्त्यांनी शी गांधीजींनी दांडी कडे प्रयाण केले.
  • 385 किलोमीटरच्या या वाटचालीत असंख्य कार्यकर्ते त्यांना येऊन मिळाले.
  • 5 एप्रिल 1930 रोजी गांधीजीं दांडी येथे पोचले.
  • समुद्रकिनाऱ्यावरील मिठ उचलून त्यांनी मिठाचा कायदा मोडला व देशभर मिठा सुरू केली.
  • इसवी सन 1931 मध्ये राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून गांधीजींनी दुसऱ्या गोलमेज परिषदेला हजेरी लावली.

Mahatma Gandhi Social Works

  • 1932 मध्ये त्यांनी अखिल भारतीय हरिजन संघाची स्थापना केली.
  • 1932 मध्ये महात्मा गांधींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जातीय निवड यासंदर्भात जो करार केला त्याला पुणे करार म्हणून ओळखले जाऊ लागले.
  • 1933 मध्ये त्यांनी हरिजन नावाचे वृत्तपत्र सुरू केले.
  • 1934 मध्ये गांधीजींनी वर्धाजवळ सेवाग्राम या आश्रमाची स्थापना केली हरिजन सेवाग्राम उद्योग, ग्रामसुधार इत्यादी विधेयक कार्यक्रम राबवण्याचा त्यांनी प्रयत्न त्यांनी केला.
  • 1942 मध्ये चले जाव चळवळीची सुरुवात झाली ‘करेंगे या मरेंगे’ हा नवा मंत्र गांधीजींनी लोकांना दिला.

Mahatma Gandhi Facts (Book)

माय एक्सपेरिमेंट विथ ट्रथ (my experiments with truth)

The Story of My Experiments with Truth

Mahatma Gandhi MPSC

भारताचे राष्ट्रपिता (Father of the Nation)

महात्मा (Mahatma), Mahatma Gandhi, Bapu ji, Gandhi ji

Death

मृत्यू 30 जानेवारी 1948. 30 January 1948 (aged 78) New Delhi, India

महात्मा गांधी ची माहिती

महात्मा गांधी या नावाने प्रसिद्ध असलेले मोहनदास करमचंद गांधी हे भारतीय स्वतंत्र आंदोलनाचे प्रमुख नेते होते.

सत्याग्रह आणि अहिंसेच्या मार्गावर चालून त्यांनी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले.

भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. त्यांच्या या आंदोलनाच्या सिद्धांतामुळे संपूर्ण जगामध्ये लोकांना नागरिक अधिकार आणि स्वतंत्र आंदोलन करण्याची पेरणा मिळाली.

महात्मा गांधींना “राष्ट्रपिता” म्हणून संबोधले जाते सुभाष चंद्र बोस यांनी 1944 मध्ये रंगून येथून रेडिओवर गांधीजींना “राष्ट्रपिता” म्हणून संबोधिले होते.

महात्मा गांधी हे संपूर्ण मानव जातीला एक पेरणा स्थान बनलेले आहे. त्यांनी नेहमी कठोर परिस्थितीतही अहिंसा आणि सत्य याच्या मार्गावर लोकांना राहण्याचे निवेदन केले होते आणि गांधीजी सुद्धा या दोन तत्त्वांचे पालन नेहमी काटेकोर पद्धतीने करत असे.

त्यांनी आपले संपूर्ण जीवन सदाचार मध्ये घालवले. ते संपूर्ण आयुष्य आपले धोतर आणि सुती वस्त्र पासून बनवलेले शाल वापरत असे, ते नेहमी शाकाहारी भोजन च ग्रहण करत असे, आपल्या आत्मशुद्धी साठी ते नेहमी उपवास करत असे.

1915 मध्ये भारतात येण्यापूर्वी गांधीजी एक वकील म्हणून दक्षिण आफ्रिकेमध्ये भारतीय समुदायाच्या लोकांना नागरिक अधिकारांसाठी न्याय मिळवून देण्यासाठी आफ्रिकेमध्ये गेले होते त्यांनी तेथे भारतीय लोकांसाठी नागरिक अधिकारासाठी तेथे मोठ्या प्रमाणात संघर्ष केला.

भारतात परतल्यानंतर त्यांनी भारतामध्ये संपूर्ण भारताचे भ्रमण केले आणि त्यांनी शेतकरी मजूर आणि श्रमिक यांना एकत्र करून संघर्ष करण्यासाठी एकत्र केले.

1921 मध्ये त्यांनी राष्ट्रीय काँग्रेस ची धुवा सांभाळली आणि त्यांनी देशाचे सामाजिक राजनेतिक आणि आर्थिक गोष्टीकडे लक्ष देण्यास सुरुवात केली.

गांधीजीने 1930 मध्ये मिठाचा सत्याग्रह केला त्यानंतर त्यांनी 1942 मध्ये भारत छोडो आंदोलन केले.

सुरुवातीचे जीवन

मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म भारतामध्ये गुजरात मधील एक तटीय शहर पोरबंदर मध्ये 2 ऑक्टोंबर 1869 मध्ये झालेला होता. त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद होते ते ब्रिटिश राज मध्ये काठीयावाड एक छोटीसी रियासत चे म्हणजेच पोरबंदर से दिवान होते.

गांधीजींची आई खुपच प्रेमळ स्वभावाची होती, त्या खूप धार्मिक होत्या त्याआपल्या कुटुंबाच्या भल्यासाठी नेहमी उपवास करत असे कुटुंबामध्ये जर कोणी आजारी पडले तर त्यांच्या सेवेसाठी त्यात दिवस-रात्र एक करत असतात ह्याच गोष्टीचा प्रभाव गांधीजींवर सुद्धा होता त्यामुळेच गांधींच्या स्वभावामध्ये अहिंसा, शाकाहार, आत्मशुद्धी आणि उपवास ह्या गोष्टी जडल्या.

1883 मध्ये साडे तेरा वर्षाचे असताना गांधीजींचा विवाह कस्तुरबा यांच्या सोबत करण्यात आला.जेव्हा गांधी पंधरा वर्षाचे होते तेव्हा त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाला पण काही कारणास्तव त्यांचे पहिले पुत्र जास्त दिवस जगले नाही. गांधीजींचे वडील करमचन्‍द्र गांधी ह्याच वर्षी देवाघरी गेले. त्यानंतर गांधीजींना चार अपत्ये झाली.

गांधीजींच्या मुलांची नावे

  • हरिलाल गांधी (1888)
  • मणिलाल गांधी (1892)
  • रामदास गांधी (1897)
  • देवदास गांधी (1900)

गांधीजींचे प्राथमिक शिक्षण पोरबंदर मध्ये आणि हायस्कूलचे शिक्षण राजकोट मध्ये झालेले होते. शैक्षणिक स्तरावर गांधीजी खूपच एव्हरेज स्टुडन्ट होते. 1887 मध्ये त्यांनी मॅट्रिकची परीक्षा आमदाबाद मधून उत्तीर्ण झाले होते. पुढच्या शिक्षणासाठी मी त्यांनी भावनगर मधील श्यामदास कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतले. पण खराब स्वास्थ्य मुळे त्यांना परत पोरबंदर ला जावे लागले.

गांधी हे आपल्या कुटुंबामध्ये सर्वात जास्त शिकलेले होते. त्यांच्या कुटुंबातील एका जाणकाराने गांधीजी यांना लंडनमधून बॅरिस्टर चे शिक्षण घेण्यासाठी सुचवले. 1888 मध्ये त्यांनी युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमधून वकिलीची परीक्षा आणि बॅरिस्टर बनण्यासाठी इंग्लंडला रवाना झाले.

आपल्या आईला दिलेल्या वचनानुसार ते लंडनला गेले त्यांनी तेथे शाकाहारी भोजन ग्रहण केले पण तिथे शाकाहारी भोजन मिळणे खूपच कठीण होते त्यामुळे गांधीजींना कधीकधी उपाशीपोटी रहावे लागत असे.

लंडनमध्ये असताना त्यांनी व्हेजिटेरियन सोसायटी ची सदस्यता मिळवली या सोसायटीमध्ये काही सदस्य थिऑसॉफिकल सोसायटीचे सदस्य होते त्यांनीच गांधीजींना गीता वाचण्याचा सल्ला दिला होता.

जून 1891 मध्ये गांधीजी भारतात परतले. त्यांनी आपली वकिली बॉम्बे मध्ये सुरू केली त्यामध्ये त्यांना काही खास यश मिळाले नाही त्यानंतर ते राजकोट मध्ये गेले तेथे त्यांनी गरजू लोकांसाठी अर्ज लिहिण्याचे काम सुरू केले परंतु काही काळानंतर त्यांनी ते ही काम बंद केले.

शेवटी त्यांनी 1893 मध्ये भारतीय कंपनीच्या बाजूने दक्षिण आफ्रिका मध्ये केस लढवण्यासाठी एक वर्षासाठी दक्षिण आफ्रिकेला गेले.

दक्षिण आफ्रिकेमध्ये गांधी

वयाच्या चोविसाव्या वर्षी गांधीजी दक्षिण आफ्रिकेमध्ये पोहोचले. ते भारतीय पेटरिया भारतीय व्यापाऱ्यांचे न्यायिक सल्लागार म्हणून दक्षिण आफ्रिकेला गेले होते.

गांधीजी ने दक्षिण आफ्रिकेमध्ये खूप वर्ष काम केले आणि त्यांच्या राजनीतिक विचार आणि नेतृत्व कौशल्याचा विकास झाला. दक्षिण आफ्रिकेमध्ये त्यांना गंभीर भेदभाव चा सामना करावा लागला.

एकदा गांधीची रेल्वेने प्रवास करत होते त्यांच्याकडे प्रथम श्रेणीचे तिकीट होते तरीसुद्धा त्यांच्या रंगामुळे त्यांना प्रथम श्रेणी मधून प्रवास करून दिला नाही गांधीजींना धक्के मारत खाली उतरविण्यात आले होते.

mahatma gandhi quotes

  • If we could change ourselves, the tendencies in the world would also change. As a man changes his own nature, so does the attitude of the world change towards him. We need not wait to see what others do.
  • A man is but a product of his thoughts. What he thinks he becomes.
  • I will not let anyone walk through my mind with their dirty feet.
  • Nobody can hurt me without my permission.
  • Happiness is when what you think, what you say, and what you do are in harmony.

Read This

Image by Wikipedia

Mahatma Gandhi Biography in marathi

16 thoughts on “Mahatma Gandhi”

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group